डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणानंतर चळवळीत सुरु झाले मनुवादी षड्यंत्र....!

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणानंतर चळवळीत सुरु झाले मनुवादी षड्यंत्र....!


१ जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले..तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर 
घडले..!
२ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यावर समाजाने अन्याय केला...! समाज मनुवादी 
षड्यंत्राचा शिकार....!

३ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूच्या अहवाल मागणीसाठीचे आंदोलन २० वर्ष चालविले 
गेले...!
४ भगवा विरुध्द निळा एक मनुवादी षड्यंत्र.......!

५ छत्रपती संभाजी महाराज आणि यशवंत उर्फ भैयासाहेब यांचे विरोधात एकच मनुवादी खेळी....!

६ सुशिक्षित लोकांनीच फुले शाहू आंबेडकर चळवळीची दिशा बदलली

७ समाज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी का उभा रहात नाही......!

विषय असा आहे की,शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांनी गौतम बुध्दापासून ते सम्राट अशोक यांचे पासून ते वारकरी सांप्रदाय पर्यंत जो भगवा ध्वज चालत आलेला आहे.तोच भगवा ध्वज स्वराज्याचे प्रतिक म्हणून शिवरायांच्या हातामध्ये दिलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.शिवरायांनी उभे केलेले समतेचे राज्य पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी चालविले आणि स्वकीयांचा विश्वासघात होऊन त्यांची औरंगाजेब याच्या माध्यमातून हत्या करण्यात आली.या सर्व बाबींना मनुवादी षड्यंत्र कारणीभूत आहे हे आता सर्वांच्या समोर आलेलीआहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये म्हणजे बाप लेका मध्ये विदुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करून संभाजीराजे यांची बदनामी करून त्यांना शिवरायापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथल्या मनुवादी षड्यंत्राने केला आहे.आणि याचाच फायदा घेऊन शिवरायांची विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे.एवढा मोठा चाणाक्ष राजा स्वकीयाच्यास्वार्थपणा मुळे आपल्या पत्नीच्या विश्वासघातामुळे मृत्यू झाला ही स्वराज्यावर अतिशय गंभीर जखम देणारी घटना घडली आहे.असेच मनुवादी षड्यंत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर घडले आहे.स्वकीयांच्या स्वार्थामुळेस्वत:च्या मेव्हाण्यानी विश्वासघात करून संभाजीराजे यांची ३८ दिवस धिंड काढून हत्या करण्यात आली आहे.आणि आज तेच मनुवादी षड्यंत्र संभाजी महाराजयांना स्वत:च्या फायद्यासाठी धर्मवीर बनवीत आहे आणि त्याला स्वकीयेच मोठ्या प्रमाणात सपोर्ट करीत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात दिसत आहे.पुढे तोच भगवा ध्वज महात्मा फुले यांनी घेऊन समाज सुधारकाची चळवळ उभी केली.साल १८९० मध्ये महात्मा फुले यांचे महापरीनिर्वाण झाले आणि त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १८९१ मध्ये जन्म झाला.म्हणजे एक महापुरुष गेला आणि दुसऱ्या महापुरुषाने जन्म घेतला.दोघेही महापुरुष समतेचा लढा लढत होते या महापुरुषांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे उत्तर यांनी कधीही प्रतिहल्ला करून दिलेले नाही.कारण मनुवादी षडयंत्राने वर्ण व्यवस्थेचे रुपांतर आता जातीय व्यवस्थेमध्ये केले होते त्यामुळे उच्च आणि नीच अशी जाती व्यवस्था निर्माण करून शुद्रातून अति शुद्र म्हणजे अस्पृश्य अशी व्यवस्था प्रस्थपित केली होती.त्यामुळे इतर समाज मनुवादी षडयंत्राला बळी पडला होता.त्यामुळे हल्ला करणारे आपलेच होते त्यामुळे त्यांचेवर प्रतिहल्ला करून “समता” प्रस्थापित होणार नव्हती याची जाण त्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होती.त्यामुळे हल्ल्याचे उत्तर त्यांनी कधीच प्रतिहल्ला करून दिलेले नाही.हल्ला करणारे यांच्या हातामध्ये कधीच भगवा ध्वज नव्हता हे आपण याठिकाणी समजून घेतले पाहिजे.मग असे असताना भगव्याला विरोध का......? (क्रमश 

Comments

Popular posts from this blog

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ११)

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १३)