फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ४)

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ४) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! भाऊ रंगारी म्हणजे मराठा समाजाचा लक्ष्मण जावळे याला पुढे करून गणपती उत्सव सुरु केला....!


१८५६ साली बाळकृष्ण गंगाधर टिळक यांचा जन्म झाला होता.महात्मा फुले यांनी ज्या वेळेस पहिली शिवजयंती १८६९ साजरा केली तेव्हा टिळक १३ वर्षाचे होते येथे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे येथे छत्रपती शिवराय आणि टिळकांचा काहीही संबध नाही.१८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना करून भगवा ध्वज घेतला होता.यावेळी टिळकांचे वय १७ वर्ष होते आपण येथे लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे भगव्या ध्वजाचा आणि टिळकांचा काहीही एक संबध नाही.१८७५ मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य सनातन हिंदू धर्माची स्थापना केली होती.त्यामुळे छत्रपती शिवराय आणि हिंदू धर्माचा काहीही संबध नव्हता येथे आपण लक्षात घेतले पाहिजे.शिवरायांच्या काळी वैदिक धर्म होता आणि तो फक्त वैदिक धर्म पंडित यांच्या साठीच होता.त्यामुळे वैदिक धर्म पद्धतीत पहिला राज्याभिषेक करूनही  शिवरायांना ही वैदिक धर्म व्यवस्था शुद्र मानीत होती.त्यामुळे शिवरायांनी पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करवून घेतला होता त्यामुळे वैदिक धर्माचा आणि शिवरायांचा काहीही संबध नव्हता असे स्पष्टपणे दिसते.सर्व बामणी व्यवस्थेने इंग्रजी राजवटीच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये आपला शिरकाव व्हावा आणि इथली प्रशासन व्यावस्था आपल्या ताब्यात यावी यासाठी त्यांनी १८५७ मध्ये इंग्रजी राजवटीच्या विरोधात उठाव केला.जेव्हा इंग्रजी राजवटीने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या तेव्हा हा उठाव याच बामणी व्यवस्थेने मोडीत काढला.तेव्हा १८७४ मध्ये शुद्रातून अति शुद्र म्हुणुन अस्पृश्यत निर्माण केली.ही अस्पृश्यता मजबूत व्हावी यासाठी १८८४ मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळक हे २८ वर्षाचे होते त्यांनी पहिली हिंदू महासभा आयोजित केली होती.सत्यशोधक धर्म आणि त्यांचा भगवा या बामणी व्यवस्थेला खूप टोचत होता.महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली शिवजयंती यांना झोप येऊ देत नव्हती.पहिली हिंदू महासभा झाल्यानंतर त्यांचे असे लक्षात आले की,जो पर्यंत महात्मा फुले जिवंत आहेत तो पर्यंत हिंदू धर्म व्यवस्था निर्माण करता येणार नाही...अखेर महात्मा ज्योतिबा फुले यांचा १९९० मध्ये मृत्यू झाला(म्हणजेच बामणी व्यवस्थेने हत्या केली).आता या बामणी व्यवस्थेला थांबविणारे कोण नव्हते महात्मा जोतीबा फुले म्हणाले होते की,ही मनुस्मृती दहन केली पाहिजे.कारण ही जो पर्यंत ही मनुस्मृती दहन होणार नाही तो पर्यंत इथला मानव सुखी होणार नाही.महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर पूर्ण रान मोकळे मिळाले होते.महात्मा फुले यांना माळी समाजाने कधीही जवळ केलेले नाही माळी समाजाने मनुवादी व्यवस्थेच्या नादाला लागून त्यांचेवर अन्यायच केलेला आहे.महत्मा फुलेंच्या मृत्यूनंतर टिळकांनी पाच वर्ष हिंदू धर्माचा प्रचार करण्यासठी जमीन तयार केली.भाऊ रंगारी म्हणजे मराठा समाजाचा लक्ष्मण जावळे याला पुढे करून काल्पनिक हत्तीचे मुख आणि मानवाचे शरीर असलेला मोदक खाणारा गणपती हा देवतांचे अधिष्टान मानून समाजातील प्रमुख घटक असणारा मराठा समाजात १९९१ पासून रुजविण्यात येऊन त्याच्या हस्ते सार्वजनिक गणपती उत्सव १९९४ मध्ये सुरु करण्यात आला.आणि लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९९५ मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी स्वत: पुढकार घेऊन हिंदू धर्माचे अधिष्टान म्हणून हा गणेश उत्सव सार्वजनिक व्हावा आणि त्याला हिंदू धर्माची मान्यता मिळावी म्हणून हिंदू – मुस्लीम दंगल घडविण्यात आली.यावेळी टिळकांचे वय वर्षे ३९ होते.आणि नंतर हिंदूचा अधिष्टाता म्हणून गणपतीला स्थान मिळाले.इकडे १८९१ मध्ये जन्म घेतलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे चार वर्षाचे होते.(क्रमश😊

Comments

Popular posts from this blog

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ११)

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १३)